0 ते ६ वयोगटाच्या मुलांच्या पालकांसाठी
समाजाचे उद्याचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम व अश्वासक असावे असे वाटत असेल तर लहान मुलांसाठी
पालकांनी काय करायला हवे ?याचसाठीचा संवाद पालक शाळेच्या माध्यमातून घडत आहे.काल परवा पर्यंत मॉंटेसरीत असणारे मुलं
कधी पहिले ते दहावीच्या वर्गात जाते हे कळत नाही.ही वर्षे किती भराभर जातात.
पालकत्व ही मुलांसोबत घडते,वाढते,शिकवते व शिकते ही.या पालकत्वाच्या प्रवासात सवंगडी पालक शाळा कायम सोबत करते.मुलांच्या क्षमता, नैसर्गिक वाढ, यासंदर्भात अनेक शंका असतात तर शाळा कोणती निवडायची ? मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा ?असे अनेक प्रश्न पालकांना भेडसावत असतात.कधी थोड्या मार्गदर्शनाने तर कधी योग्य त्या संवादाने या प्रश्नांना आव्हानांचे रूप येत नाही.एक सकारात्मक आशावाद व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन याचमुळे सवंगडी घ्या पालकांना पालक शाळा आपलीशी वाटते.